Thursday, 23 April 2015

देवासाठी

देवा तुला मंदिरात एकट्याला भीती वाटत नाही का रे?
भीत जा रे माणसाला, माणूस खुप बदलला आहे

गुदमरुन जाशील रे कधी तरी गाभाऱ्यातुन तुला पळताही येणार नाही, सी.सी.टीव्ही. च्या जाळ्यात तुला कैद केला आहे

जाऊ तरी कसा देतील तुला तुझ्या जीवावरच त्यांचा धंदा चालू आहे

तुला माहित आहे की नाही मला माहित नाही पण तुझ्या दर्शनासाठी आता व्ही.आय. पी. रांगा लागतात

देणगी म्हणून आलेले पैसे मोजण्यासाठी जास्तीची माणसं बोलावी लागतात

देणगीतुन आलेल्या पैशातून मोठ मोठ्या पार्ट्या रंगतात, पार्ट्या करणारेच तुझ्या फोटोचे लॉकेट घालून फिरतात  

देवा तुला मंदिरात एकट्याला भीती वाटत नाही का रे?
भीत जा रे माणसाला, माणूस खुप बदलला आहे

Thursday, 19 March 2015

हे असच असतं

माणसं ही माणसंच असतात फक्त सगळे सारखे नसतात
संगीतातले सुर तरी कुठे सारखे वाजतात
आणि पहायला गेलं तर हाताची बोटं तरी कुठे सारखे असतात
आपण उगीचच अपेक्षा करतो नेहमी सुखाची पण आयुष्यातही चढ उतार चालुच असतात

Monday, 16 March 2015

निर्दयी पाऊस

इतका कसा रे तू निर्दयी झाला तोंडाशि
आलेला घासच पळवून नेला

रक्ताच पाणी करून फूलवला होता मळा सारा
एका क्षणात सगळं भुइसपाट करून गेला

डोंगर उत्रवायचा होता कर्जाचा
तू तर कर्जाचा बोजा वाढवून गेला

जुळवत होतो हिशोब आयुष्याचा पण तुझ्या
आसमानी हैदोसाने सगळा खेळच् चौपट केला

उर बडवतोय मीच माझा, नशिबाने कसा घात केला.
पुढच्या जन्मी शेतकरी नको करू एवढा नवस मात्र देवाजवळ आवर्जून केला

हुंदके आवरले मी माझे डोळ्यात टीपुस नाही येऊ दिला
तू मात्र मनमुराद कोसळून गेला

इतका कसा रे तू निर्दयी झाला तोंडाशी
आलेला घासच पळवून नेला
                         
          

Friday, 13 February 2015

टिचकि

जे लोक म्हणतात की मला खोटं बोलण्याची आणि खोटं बोलणारांची खुप चीड आहे, अशा लोकांचा एक शब्द खरा नसतो. विश्वास नसेल तर आजमावुन बघा...

Sunday, 1 February 2015

परप्रांतीय

पुण्याची पी. एम. पी. एल. पुणेकरांसाठीच झाली पारखी,
प्रत्येक बसमध्ये परप्रांतियांचीच गर्दी

कुठल्याही स्टॉपवर्ती दिसते त्यांची एक तरी टोळकी,
जेष्ठ नागरीकांना मात्र बसमध्ये पाय ठेवण्याचीही वाटते धास्ती

आपण सगळे भारतीय आहोत हा विचार मनाला चाटून जातो हे आहे खरं,
पण सगळ्याच परप्रांतियांना फक्त महाराष्ट्रातच का वाटतं बरं?

हे फक्त पुण्यातच घडतं असंही काही नाही,
सगळ्याच शहरांची परिस्थिती काही वेगळी नाही

आता तर खेडोपाडी सुद्धा परप्रांतीय जोपासतायेत त्यांचा वसा,
महाराष्ट्रीयन माणसासाठी मात्र महाराष्ट्र झालाय परका जसा

                                                                                  -  सोमनाथ ज-हाड

Tuesday, 20 January 2015

आयुष्य

आयुष्य सुंदर आहे असं बऱ्याच वेळा वाटतं,
पण दुःखांच सावट आमच्याच आयुष्यात का दाटतं?

सुख साठवून ठेवता येत नाही आणि दुःख कायम
टिकून राहत नाही हे बऱ्याच वेळा मनाला पटतं

पण सुख जवाएवढे आणि दुःख पर्वताएवढे हे फक्त
आमच्यासाठी आहे की काय याचहि कधी कधी आश्चर्य वाटतं